नाशिक धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून रात्री दहा वाजता २ लाख ९१ हजार इतके क्युसेक पाणी सोडल्याने गोदावरीने रुद्रावतार धारण करत पूररेषा ओलांडून कोपरगाव शहरासह तालुक्यातील नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.<br /><br />रविवारी कोपरगाव शहरातील नदीकाठचे बाजारतळ, इंदिरानगर, गोरोबानगर, दत्तनगर, महादेवनगर, सर्वे न १०५, मोहिनीराजनगर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने रविवारी दुपारपासूनच येथील १०० ते १२० कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. सायंकाळी शहरातील नदीवरील पूल पाण्याखाली गेला तसेच शहरातील खंदकनाल्याला देखील पूर आल्याने रात्री उशिरा शहरात पाणी शिरले होते.<br /><br />तालुक्यातील गोदावरी काठच्या ८ गावातील ५९ कुटुंब व २९५ व्यक्ती ग्रामपातळीवरील प्रशासकीय यंत्रणा, मित्रमंडळ, सामाजिक संस्था यांच्या मदतीने नदीकाठी पूररेषेत असलेल्या घरातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवून राहण्याची व्यवस्था केली. प्रशासनाने कोपरगाव तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सोमवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. गोदावरी नदीवरील मंजूर येथील बंधाऱ्यांचा भराव वाहून गेल्याचे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.<br /><br />आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />#LokmatNews #Ahmednagar <br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19